Posts

Showing posts from August, 2018
मरावे परी कीर्तिरूपे उरावे...!         काल संध्याकाळी फिरायला गेलो असताना नेहमीप्रमाणे काही ओळखीची मंडळी भेटली. त्यातीलच एक बापू. वयोवृद्ध. वय साधारण ७०-७२ वर्षे असेल. पण चालणे तरुणाला लाजवेल असे. आम्ही बसलो आणि गप्पा सुरु झाल्या. आणि कशावरून तरी बापू एकदम गंभीर झाले. म्हणाले, ” सर परमेश्वराला माझी एकच प्रार्थना आहे.मी हा असा चालताबोलता आहे तोवरच त्याने मला न्यावे, मग आज असो की दहा वर्षांनी. पण अंथरुणावर पडणे नको. “ मी म्हटले, “ बापू, तुमचे बरोबरच आहे. प्रत्येकाचीच तशी इच्छा असते. आजारी होऊन, अंथरुणाला खिळून मरण यावे असे कोणाला वाटते ?”      मग मी विचार करू लागलो की बापू असे का म्हणाले असतील ? खरे तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पण बापूंना मुले, सुना, नातवंडे सगळे आहेत. सुना म्हणजे त्यांच्या लेकीच आहेत. वडिलांच्या मायेने ते सुनांची विचारपूस करतात. मुख्य म्हणजे त्यांना फारसे प्रश्न विचारत नाहीत. घरातील त्यांच्या रोजच्या जीवनात कुठलीही ढवळाढवळ करीत नाहीत. त्यांनी काही विचारले तरच वडिलकीच्या नात्याने सल्ला देतात. त्यामुळे सुना सुद्धा त्यांना आदर...